investment plans ; आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक आई-वडिलांची एकच धडपड “आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल कसं करायचं?” उत्पन्न मर्यादित असतानाही अनेक पालक खाजगी पॉलिसी, विमा, एफडी, सोने-बँका अशा मार्गांचा विचार करत असतात. पण आता सरकारनं एक अशी योजना आणली आहे, जी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी देवासारखी आहे एनपीएस वात्सल्य योजना!investment plans
काय आहे ही योजना?
सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारनं सुरू केलेली ‘एनपीएस वात्सल्य योजना’ ही खास 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे. यामध्ये दरमहा फक्त 834 रुपये गुंतवले, तर पुढे जाऊन तुमचं मूल कोट्यधीश होऊ शकतं! होय, तुम्ही बरोबर वाचताय ११ कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार होऊ शकतो.
योजना कशी चालते?
प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या नावावर (18 वर्षांखालील) ही गुंतवणूक करू शकतो.
दरवर्षी फक्त 10,000 रुपये गुंतवले तरी चालते.
ही गुंतवणूक मुलाच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत सुरू ठेवली, आणि सरासरी 12.85% परतावा मिळत राहिला, तर जमा रक्कम 11 कोटी रुपये इतकी होऊ शकते!
कोण पात्र आहे?
- 18 वर्षांचे झाल्यावर हे खाते थेट एनपीएस टियर-1 खात्यात रूपांतरित केलं जातं.
- मुलाचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असावं.
- मूलाचं आधार आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे.
- किती रकमेपासून सुरूवात करता येते?
- फक्त वार्षिक 1,000 रुपये गुंतवूनही खाते सुरू करता येतं.
त्यावर कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. म्हणजेच उत्पन्न वाढल्यावर तुम्ही हवी तशी रक्कम वाढवू शकता.
छोटं टाकावं, मोठं मिळावं!
थोडी बचत, मोठा फायदा. खाली दिलेल्या टक्केवारीप्रमाणे परतावा मिळाल्यास किती फंड तयार होईल, ते पाहा:
👉 12.86% परतावा – 11 कोटी रुपये
👉 11.59% परतावा – 5.97 कोटी रुपये
👉 10% परतावा – 2.75 कोटी रुपये
गरज पडली, तर पैसे काढण्याची मुभा
- कधी कधी अचानक शिक्षण, आजारपण किंवा अपंगत्व यांसाठी खर्च येतो. ही योजना अशा प्रसंगी उपयोगी पडते.
- गुंतवणूक सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी, एकूण रकमेच्या २५% पर्यंत रक्कम काढता येते.
- शिक्षण, उपचार, अपंगत्व अशा गरजांसाठीच ही रक्कम वापरता येते.
- अशी 3 वेळा पैसे काढण्याची मुभा असते.
- मूल 18 वर्षांचं झाल्यावर काय?
जर खात्यातील रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर:
80% रक्कम पेन्शनसाठी (वार्षिकी) वापरली जाईल.
20% रक्कम एकरकमी काढता येईल.
जर रक्कम 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर:
संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येते.
आकस्मिक मृत्यू झाल्यास काय?
जर मुलाचा मृत्यू झाला, तर त्या खात्यातील संपूर्ण जमा रक्कम पालकांना हस्तांतरित केली जाईल.
Disclaimer: वरील माहिती विविध माध्यमांतून संकलित असून योजनेतील बदल किंवा अद्ययावत माहितीसाठी संबंधित सरकारी विभागाची अधिकृत वेबसाईट पाहावी.