शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण एक अट! महाराष्ट्रात कर्जमाफी जाहीर, पण सर्वांना मिळणार नाही

Farmer Loan Waiver List Maharashtra | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे. गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला आता यश आलं आहे.Farmer Loan Waiver List Maharashtra

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 20 जूनला पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात, तुम्ही तयार आहात का? 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: बच्चू कडू यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि कर्जमाफीची घोषणा केली. पण या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट ठेवण्यात आली आहे आणि याच अटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सरकारने कर्जमाफी जाहीर केली खरी, पण त्यात अट ठेवली आणि समिती स्थापन केली म्हणजे उशीर करायला नवीन कारण.” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “कर्जमाफी होणार, पण आता सरकार अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवणार आहे.”

आता यावेळी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत पात्र शेतकऱ्यांची निवड होणार आहे. म्हणजेच कर्जमाफी सगळ्यांना मिळणार नाही, तर केवळ गरजूंनाच मदत मिळेल.

हे पण वाचा | सरसकट कर्जमाफीशिवाय माघार नाही! बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा, शेतकऱ्यांचा संताप उफाळला!

या वेळेस ‘वर्गवारी’ होणार!

मागच्या वेळेस सरकारने सरसकट कर्जमाफी दिली होती, कोणतीही अट नव्हती. पण यावेळी महायुती सरकारने ठरवलं आहे की, शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहून कर्जमाफी दिली जाईल. आयकर भरणारे मोठे शेतकरी यांना बाजूला ठेवून, खरोखरच गरजूंना आणि मागास शेतकऱ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे.

या समितीचा निर्णय अंतिम असेल. ज्या शेतकऱ्यांची नावं ही समिती शिफारस करेल, त्यांनाच कर्जमाफी मिळेल.

शेतकऱ्यांसाठी हा दिलासा असला तरी, ही एक अट आणि ‘वर्गवारी’ची प्रक्रिया त्यांच्या मनात नवा प्रश्न निर्माण करत आहे  “हे खरंच मदतीसाठी आहे की वेळ मारून नेण्यासाठी?”

शेवटी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, पण त्यासाठी नवे अडथळे निर्माण नकोत, हीच त्यांची मागणी आहे. सरकारने दिलेल्या वचनांची अंमलबजावणी किती लवकर होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण कर्जाचं ओझं आता पेलवेनासं झालंय… वेळेवर मदत मिळाली नाही, तर कुठेतरी शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा ढळण्याची भीती आहे.

Disclaimer : 

वरील माहिती ही लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या बातम्या, अधिकृत निवेदनं आणि सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अंमलबजावणी, पात्रता आणि अटी या वेळोवेळी बदलू शकतात. वाचकांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत शासकीय संकेतस्थळावर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती पडताळून घ्यावी. या लेखातील माहितीवरून कोणीही थेट आर्थिक निर्णय घेऊ नये. या लेखाचे लेखक व प्रकाशक यांची यासंदर्भातील कोणतीही जबाबदारी राहणार नाही.

अशाच अनेक नवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment