Farmers Loan Waiver Maharashtra | शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांच्या या आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. पण तरीही बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या या लढ्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.Farmers Loan Waiver Maharashtra
हे पण वाचा :– Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’
दरम्यान, आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुद्द उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला आणि महत्वाची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल. त्या समितीत बच्चू कडू यांनाही स्थान दिलं जाईल. समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
हे पण वाचा :– Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’
बावनकुळे यांनी सांगितले की, “बच्चू कडू यांच्या १७ मागण्यांसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सर्व संबंधित विभागांचे मंत्री आणि स्वतः बच्चू कडूही उपस्थित राहतील. दिव्यांगांच्या अनुदानाचा विषय येणाऱ्या अधिवेशनात मांडला जाईल. अनुदान वाढीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बच्चू कडू मिळून घेतील.”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बावनकुळे म्हणाले, “संपूर्ण माहिती आणि डेटा गोळा करून कर्जमाफीचा मार्ग काढू. पण त्यानंतर बच्चू कडू यांनी थेट उपस्थित शेतकऱ्यांना विचारले की, ‘हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का?’ यावर सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने सांगितले, ‘आम्हाला ही पद्धत मान्य नाही, आम्हाला सरसकट कर्जमाफीच हवी!’
हे पण वाचा :– Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’
यावर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं की, “कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज वाटपासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेईन.” तरीही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. ते म्हणाले, “आम्ही समाधानी नाही. आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही.”
शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज बनलेले बच्चू कडू आपल्या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश देत आहेत केवळ आश्वासनं नकोत, सरसकट कर्जमाफी हवीच! या लढ्याचा शेवट कसा होतो, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Disclaimer:वरील माहिती विविध माध्यमांतून मिळालेल्या बातम्या आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीनुसार सादर करण्यात आली आहे. यामधील कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा किंवा अंतिम निर्णय संबंधित शासन अथवा अधिकृत व्यक्तींकडून होईपर्यंत निश्चित मानू नये. कृपया कोणताही आर्थिक अथवा वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत स्रोतांची खात्री करावी.
1 thought on “सरसकट कर्जमाफीशिवाय माघार नाही! बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा, शेतकऱ्यांचा संताप उफाळला!”